Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

कृषी तंञज्ञानातील क्रांती



कृषी तंञज्ञानातील क्रांती

भारत हा शेती प्रधान देश आहे. परंतु भारतीय कृषी तंत्रज्ञान अतिशय मागास होते. १९४७ मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली. त्यात भारताच्या वाटयाला ८२% लोकसंख्या, ७५% तृणधान्याखालील क्षेञ व ६९% बागायत क्षेत्र भारताकडे आले.
स्वातंत्रोत्तर काळात भारताला शेतीप्रधान देश असूनही पी एल ४८० करारानुसार १९५५ मध्ये अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला.

शेती उत्पादन वाढविण्यासाठी योजना

१९४८ मध्ये अधिक धान्य पिकवा मोहिम सुरू झाली.

हरितक्रांती

हरितक्रांती

हरित क्रांतीः-

१९६४ मध्ये मेक्सिकोचे शास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोर्लांग यांनी गडद हिरवा रंग असलेल्या बुटक्या, खताला व पाण्याला प्रतिसाद केणा-या व कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणा-या संकरीत जातींचा शोध लावला. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. म्हणून त्यांना जागतिक हरीत क्रांतीचे जनक म्हणतात. याबद्दल त्यांना १९९० चा नोबेल पुरस्कार मिळाला.
अन्नधान्याच्या उत्पादनातील प्रचंड वाढीस विल्यम गॅड (युएसए) यांनी ग्रीन रिव्हॅल्यूशन असे नाव दिले.
भारतातील हरित क्रांती घडविण्यासाठी लालबहादुर शास्त्रींनी, केंद्रीय कृषीमंत्री सी. सुब्रमण्यम्, कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन व शिवरामन या शेती शास्त्रज्ञांचा एक कार्यगट नेमला. यांच्या नेतृत्वाखाली अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी आराखडा तयार केला. त्या अंतर्गत १९६०-६१ मध्ये भारत सरकारने सधन/प्रकर्षित शेती जिल्हा कार्यक्रम (Intensive Agricultural District Programme)) हा पथदर्शी प्रकल्प (Pilot Projet) हाती घेतला. त्या अंतर्गत १७ जिल्हयांत अधिक उत्पन्न देणा-या वाणांचा कार्यक्रम (HYVP) १९६६ मध्ये सुरू झाला. त्याला यश मिळाल्याने हा कार्यक्रम पुढे ११४ जिल्हयांमध्ये राबविण्यात आला. याचीच परिणिती म्हणजे हरीत क्रांती होय. अन्नधान्याच्या उत्पादनात प्रत्यक्ष वाढ १९६७-६८ मध्ये झाली.
भारतीय हरीत क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांनी भारतीय वातावरणास पोषक अशा मेक्सिकन जातीच्या चाचण्या पंतनगर (युपी) व लुधियाना येथे घेतल्या .या जातींनी उत्पादनात प्रचंड क्रांती केली.या कार्याबद्दल एम.एस.स्वामीनाथन यांना १९९८ मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला, तर सी.सुब्रम्ण्यम यांना भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार म्हटले जाते.
मेक्सिकोहून आयात केलेले रोजो, सोनालिका ६४ व कल्याणसोना हे बियाणे १९६४-६५मध्ये उपलब्ध झाले.या बियाण्याची चाचणी पंजाब,हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेशातील ११४ जिल्हयात करण्यात आली. त्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी शोधलेली पहिली संकरित जात म्हणजे पी व्ही १८ ही गव्हाची जत शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात आली.
भात पीकाची तायचुंग नेटीव्ह १ ही जात जैवानमधुन आणली. त्यापासून अनेक संकरीत जाती तयार केल्या. त्यापैकी जया ही एक जात आहे.
भारतात भात व गहू या पीकांचा हरीतक्रांतीत मोठा वाटा होता.
भारतातील हरीतक्रांती सुरू झाल्याचे वर्ष – १९६५-६६
भारताने अन्नधान्याची आयात थांबविली – १९७१
भारताने सर्वप्रथम धान्य निर्यात केले – १९७५

महाराष्ट्र व हरीतक्रांती –

महाराष्ट्रात हरीतक्रांती यशस्वी करणारे – वसंतराव नाईक
महाराष्ट्रात हरीतक्रांती घडवून आणणारे पीक – ज्वारी
१ जुलै १९८९ पासून वसंतराव नाईक यांचा जन्मदिन राज्यात कृषीदिन म्हणून साजरा करतात.
भारताच्या कृषी उत्पादनात महाराष्ट्रात वाटा घटत आहे.
महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत तुटीचे राज्य असून २० % अन्नधान्य आयात करावे लागते.
महाराष्ट्रात हरीत क्रांती यशस्वी न होण्याचे कारण – जलसिंचनाचा अपुरा पुरवठा

हरितक्रांतीचे फायदे –१) अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपुर्ण झाला .

२)दर हेक्टरी उत्पादनात वाढ. ३)शेती किफायशीर झाली.

४)परकीय चलनाची बचत.

हरितक्रांतीवर आक्षेप१) फक्त गहू व भाताच्या उत्पादनातील क्रांती २) आर्थिक विषमतेत वाढ ३) जमिनी नापीक झाल्या.

भारतात दुसरी हरीतक्रांती झाली – १९८३-८४

भारतात तिसरी हरीतक्रांती – सप्तरंगी क्रांती – १) हरीत २) नील ३) श्वेत ४) धवल ५) तपकीरी ६) पीत ७) कृष्णक्रांती

अन्नधान्य उत्पादन –

भारत महाराष्ट्र

१) १९५१-५१ दशलक्ष टन १) १९७७-७८- १०.५ लाख टन

२) २००७-०८ २३०.०८ दशलक्ष टन २) २००७-०८ – १५.४ दशलक्ष टन

३) २००८-०९ २३३.८८ दशलक्ष टन ३) २००८-०९ -११.७ दशलक्ष टन

देशाच्या अन्नधान्य उत्पादनात राज्यांचा वाटा – १) उत्तरप्रदेश – २०.४% २) पंजाब – ११.१% ३) म. प्रदेश – ९.९% ४) बिहार – ७% ५) महाराष्ट्र – ६.९%

भारतात अन्नधान्याची सर्वाधिक दरडोई उपलब्धता – पंजाब (१०३१.६ किलो)
भारतात अन्नधान्याची दरडोई सर्वात कमी उपलब्धता – दिल्ली (२.८ किलो), केरळ (२४.२ किलो)
महाराष्ट्रातील अन्नधान्याखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे – अहमदनगर, पुणे, परभणी इ.

विविध उत्पादनातील क्रांती

अन्नधान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ – हरीतक्रांती

मत्स्य उत्पादनात झालेली क्रांती – निलक्रांती

दुग्धोत्पादनात झालेली वाढ – धवलक्रांती

कापुस व रेशीम उत्पादनातील क्रांती – श्वेतक्रांती

फळे, तेलबिया व अंडी उत्पादनातील क्रांती – पितक्रांती

झिंगा उत्पादनातील क्रांती – गुलाबी क्रांती

कोको उत्पादनातील क्रांती – ब्राउन क्रांती

खाद्यतेल उत्पादनात वाढ करण्यासाठी कार्यक्रम – ऑपरेशन गोल्डन फ्लो

दुध उत्पादनात वाढ होण्यासाठी कार्यक्रम – ऑपरेशन फ्लड (दुधाचा महापुर)

हरीत क्रांती यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटक

संकरीत बियाणे, रासायनिक खते व जलसिंचन
बियाणे

बियाणे

१) बियाणे

बियाणे विकासाचे नवे धोरण – १९४८
राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे स्थापना (NCP) – १९६३
संसदेने बियाणे कायदा पास केला – १९६६
१९६८ मध्ये बियाणे अधिनियम तयार झाला. जाने १९७३ मध्ये हा कायदा देशभर लागू केला.
१९६९ मध्ये भारतीय राज्य कृषी महामंडळाची (SFCI) स्थापना झाली. देशात सध्या १३ राज्य बियाणे महामंडळ आहेत.
बियाणे
National Seeds Training Centre – Varanasi
जागतिक बँकेच्या मदतीने अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची (महाबीज) स्थापना झाली – २८ एप्रिल १९७६
बीज परीक्षणाची पहिली प्रयोगशाळा सुरू करणारा देश – जर्मनी
राज्यातील बीज तपासणी प्रयोग शाळा – १) नाशिक २) पुणे ३) नागपुर ४) औरंगाबाद ५) अकोला ६) परभणी

बीज प्रक्रिया – बीजप्रक्रियेमुळे बियानण्याची उगवणक्षमता वाढते. पेरणीस सुलभता होते.

रोग किडीपासून संरक्षण मिळते, उत्पादनात वाढ होउन प्रत सुधारते.

कपाशीची पेरणी सुलभ होण्यासाठी बीजप्रक्रिया करतात – सल्फ्युरिक ऍसिडची.
बाजरी आणि भाताचे रोगट बियाणे बाहेर काढण्यासाठी व बाजरीतील अरगट, भातावरील करपा, कडा करपा नष्ट करण्यासाठी बीज प्रक्रिया – मिठाच्या द्रावणात बुडविणे.
बटाटयाची सुप्तावस्था २ ते ३ महिने अगोदरच संपविण्यासाठी बटाटयाचे काप बुडवितात – १% थाइ ‘युरियात
कोबीवर्गीय भाजीपाल्याच्या बियाण्यास काळीकुज व अल्टरनेरिया रोगास प्रतिबंध करण्यासाठी बीजप्रक्रिया – उष्णजल प्रक्रिया
उष्णजल प्रक्रियेसाठी बियाणे ४९ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात ५ मिनीटे बुडवितात.

अ.क्र पीक रोग तापमान (अंशC) बुडविण्याचा काळ
१)

२)

३)

४)

५)
गहू

बार्ली

फ्लॉवर/ काकडी

वांगी, कोबी, टोमॅटो

उस

चाबूक, काणी
काळी

काळी

बुरशी

बुरशी

गवताळ वाढ

खुजा रोग
५४

५२

५०

५०

५०
१० मिनीटे

१३ मिनीटे

२० मिनीटे

२८ मिनीटे

२ तास

टोमॅटोवरील मोझॅकचे नियंत्रण करण्यासाठी थंडजल प्रक्रिया करतात.
गहू व बालीच्या मोकळ्या काणीच्या नियंत्रणासाठी बियाणे पोत्यात सैल बांधून १५ ते २२ अंश सिल्सिअस तापमानाच्या पाण्यात ४ तास भिजवतात.
द्विदल वर्वातील पीकाच्या बियाण्यास -हायझोबियम सारखे जीवाणू संवर्धक चोळल्यास बिजांकुरण वेगाने होते.
तसेच हेत्टरी २० ते २५ कि लो नञ वाचते.
बियाण्यात तणांच्या बिया, तुस, काडया, खडे यांचे प्रमाण २% पेक्षा जास्त असल्यास बियाणे अयोग्य समजतात.

बिजोत्पादनः–

ज्वारी व बाजरीचे बीजोत्पादन घेण्यासाठी नर व मादीचे झाडांचे प्रमाण २:४ व २:६ या प्रमाणात घेतात.

उती संवर्धन (टिश्यू कल्चर) – सजिवांच्या पेशी, उती किंवा अवयव निजंर्तुक माध्यमावर काचपात्रात प्रयोग शाळेत योग्य तापमान व प्रकाश देउन वाढविणे व रोपे तयार करण्यास उतीसंवर्धन म्हणतात.

फायदे –

१) सुक्ष्म अग्रांकूर संवर्धनाद्वारे मातृवनस्पती सारखीच गुणधर्म असलेली प्रजा थोडया कालावधीत मोठया प्रमाणावर तयार होते.

२) रोपे एकाच वेळी परिपक्व होतात व रोगमुक्त असतात. उदा – अ) केळी व उसाचे रोपे एकाच तयार करण्यासाठी उती संवर्धनाचा वापर करतात ब) हरीतगृहात लागवडीस योग्य जरबेरा, आर्कीड, ऍन्थुरीयम इ. फुलझाडांच्या अभिवृध्दीसाठी उती संवर्धनाचा वापर करतात.

३) उसाची कांडीपासून एकशाकीय लागवड केल्यास काणी, लाल्या, गवताळवाढ, मोझेक सारखे रोग पुढील पिढीत जातात हे उती संवर्धनात टाळता येते व हजारो हेक्टर क्षेत्रात उत्पादन घेता येते.

जैव तंत्रज्ञान – सजिवांच्या पेशीमध्ये अनुवंशीय बदल घडवून त्यांची कार्यक्षमता वाढविणे. मानवी उपयोगाचे पदार्थ मिळविण्याच्या शास्त्राला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. जैवतंत्रज्ञानाच्या रेणूविय जैवशास्त्र व अनुवांशिकी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाद्वारे बदल घडवून अधिक उत्पन्न घेता येते. यामुळे अधिक उत्पन्न देणा-या अधिक पोषक द्रव्य असणा-या रोग प्रतिबंधक व दुष्काळ प्रतिकारक्षम पीकांच्या जाती निर्माण करता येतील.

उदा – मॉन्सेन्टो या बहूराष्ट्रीय अमेरिकन कंपनीने बी. टी (बॅसिलस थुरिजेनसिस) नावाचे कापसाचे बियाणे विकसित केले असून त्यात बोंड अळीचा नाश करणारे बॅसिलस थुरिजेनसिसचे जीवाणूचे जनुक समाविष्ट केले आहे. त्यामुळे औषधावर होणारा हजारो कोटी रूपयांचा खर्च वाचणार आहे व उत्पादनात ३०% वाढ होणार आहे. या बियाण्याच्या व्यापारी तत्वावरील लागवडीस २३ मार्च २००२ रोजी केंद्रीय पर्यावरण व वन मंञालयाच्या अखत्यारित जनुकीय अभियांत्रिकी समितीने मंजुरी दिली. याला महाराष्ट्रात सहाकार्य महिकोचे आहे.बी.टी.कॉटनच्या जाती – मेक १२,मेक १६२ मेक १८४ इ.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २००२ मध्ये प्रसारीत केलेले वाण

१) पंचवटी (NIDW-15) – हा गव्हाचा वाण, N- ५९ पेक्षा २५% जास्त उत्पादन

२) फुले हरीत (JB-16) – ही भरीतासाठी योग्य असणारी जास्त उत्पादनक्षम वांग्याची जात आहे.

३) कृष्णा पान (DPB-6) – कमी तिखट व फिक्कट हिरव्या रंगाचे पानवेल

४) फुले प्रेरणा – (GKGL-42) – ग्लॅडिओलसची लवकर येणारी व फुलदाणीत १० दिवस टिकणारी जात

२)टर्मिनेटर जीन – या तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या बियाण्यामुळे उत्पन्नात प्रचंड वाढ होणार असून जेव्हा पीकाचे उत्पन्न येईल व ते पिकाचे उत्पादन बियाणे म्हणून वापरल्यास नवीन उत्पन्न झाडापासून अन्नधान्य मिळणार नाही. तसेच परागिभवनामुळे इतर पिकांवरही त्याचा दुष्पपरिणाम होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतक-यांना दरवर्षी बहुराष्ट्रीय कंपन्याकडून बियाणे विकत घ्यावे लागेल. त्यामुळे या तंत्रज्ञानाला जगात सर्वत विरोध होत आहे.

२)पीक संरक्षण –

राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था – हैद्राबाद
हिंदुस्थान इन्सेक्टीसाईडची स्थापना – १९५४
हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल लिमिटेडची स्थापना – १९६०

वनस्पतीवर पडणारे रोग –

कारण होणारे रोग

१) कवक – काजळी, तांबेरा (रस्ट), भूरी, अरगट, वादी, डिंक्या, काणी, केवडा (डावूनी मिल्डयू), टिका इ.

२) जीवाणू – खै-या / सायट्रस कँकर [ लिंबू ], मर (विल्ट) [ तंबाखू ], भाजीपाला सडणे, कापसाच्या पानावरील काळे ठिपके, जीवाणू करपा इ.

३) विषाणू – गवत्या (उस), घेवडा, भेंडी, टोमॅटोवरील ठिपके, पपईची पाने पिवळी पडणे, केळीवरील शेंडे झुपका (बंची टॉप) , उसावरील केवडा (मोझॅक) गवताळ वाढ (ग्रासी शुट), बोकडया, मिरचीचा चुरडामुरडा, भेंडीचा केवडा, मोसंबीचा डायबॅक (सलरोग) इ.

डी.डी,टी नावाचे पहिले किटक १९३९ मध्ये स्वित्झरलंडमध्ये तयार करण्यात आले.
पीकांवरील किटकांची संख्या वाढून जेव्हा ती आर्थिक सीमा गाठते तेव्हा त्यास किड म्हणतात.
किड नाशके ही व्यापक संकल्पना असून त्यात किटक नाशकांचा समावेश होतो.
किटकनाशकात असणा-या क्रियाशील घटकांचे प्रमाण – ९० %
किटकनाशकात भूकटीच्या रुपात असणारे क्रियाशील घटक – १०%
पाण्यात मिसळणा-या भूकटीत असणारे क्रियाशील घटक – २० ते २५ %
पाण्यात विरघळण्या-या किटकनाशकांना म्हणतात. इमल्शन कॉन्सेन्ट्रेटर (EC)स
साठविलेल्या धान्यात ओलावा १० % च्या जवळपास ठेवल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

पीक रोग /कीड किटकनाशके/ औषधे
बाजरी

भात

गहू

भूईमुग
गोसावी, केवडा

रागी बुरशी, करपा

तांबेरा

टिक्का व तांबेरा
मेटॅलॅक्झिन एमझेड एमझेड – ७२

बोर्डोमिश्रण (ताम्रयुक्त)

मॅन्कोझेब

गंधक किंवा मॅन्कोझेब

१८७४ मध्ये आफ्रीकेतील मादागास्कर मधून भारतात आलेली, १९९३ मध्ये औरंगाबाद व १९९८ मधये नाशिक व २००१ मध्ये कोपरगावला पोहचलेली गोगलगाय – राक्षसी शंखी गोगलगय (आफ्रीकन स्नेल)

जैविक कीड नियंत्रण

भारत सरकारने राज्य सरकारच्या सहाय्याने १९९४ मध्ये भात व कपाशीच्या कीड नियंत्रणासाठी सुरू केलेला कार्यक्रम – एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम .
निसर्गातील ९८% किडीचे नियंत्रण नैसर्गिक रित्याच होत असते.
किडींचे परोपकारी अथवा परीभक्षी किटक किंवा अन्य प्राणी आणि रोगजंतुचा वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली नियमित करणे म्हणजे जैविककिड नियंत्रण होय.
ज्वारी, बाजरी, हरभरा, तुर, कपाशी, सुर्यफुल यावरील किटकनाशकांस दाद न देणा-या घाटेअळी (हेलीकोव्हरपा) चा न्युक्लिओ पॉली हायड्रॉसिस व्हायरस (NPV) मुळे आपोआप नाश होतो.
कडधान्ये, तृणधान्ये, गळीतधान्ये कापुस यावरील घाटेअळी ठिबक्याचे बोंडअळी व शेंदरी बोंडअळी यांचे पतंग पकडण्यासाठी सापळा – फे रोमोन सापळे (लिंग प्रलोभन)
नर फळमाशांना सापळयात अडकविण्यासाठी रसायन – मिथील युरेनॉल
अळी नियंत्रानासाठी विषाणू – हेलीकोव्हरपा, स्पोडोप्टेरा इ.
किड नियंत्रणासाठी परोपजीवी किटक – ट्रयकोग्रामा, परभक्षी किटक – क्रायसोपरला
कोबी,टमाटे. वांगी, कापुस, सोयाबीन यावरील पतंग वर्गातील अळयांच्या नियंत्रणासाठी जीवाणू – बॅसिलस थुरिजेनसिस
उस, ज्वारी, मका व भात यावरील खोडकिडयाच्या नियंत्रणासाठी जैविक घटक – ट्रायकोग्रामास्पेसिज
सर्व पिकांवरील मावा, तुडतुडे, फुलकिडे, किडिची अंडी, लहान अळया, पिल्ले यांच्या नियंत्रणासाठी जैविक घटक - क्रायसोपर्ला कार्निया
सर्वच पिकांवर पडणा-या मर व मुळ कुजव्या रोग इ. बुरशीजन्य रोगांवर परजीवी पध्दतीने जगणारा व रोग नियंत्रणासाठी घटक - ट्रायकोडर्मा व पेसिलोमायसिन
पिकांवरील सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी पिकांत आफ्रिकन अथवा फ्रेंच झेंडूचे मिश्र पीक घ्यावे. झेंडूच्या मुळातील रसायनात सुत्रकृती नाशकाचे गुणधर्म असतात.
केवडा, करपा रोगावर उअयुक्त बोर्डो मिश्रणे तयार करण्याची पध्दत – १०० लि. पाणी, १ किलो चुना व १ किलो मोरचुद
पेशी अंतर्गत कार्य करणारी बुरशीनाशके – ऑक्झॅथीन, बेनोमिल, माफॉलीन, काबैन्डेझीम इ.
लिंबू, द्राक्षे, टोमॅटो, कापूस यावरील अणूजीवजन्य रोगावरील प्रतिजैवक-

स्ट्रेप्टोसायक्लीन

विषाणू किटकामार्फत होणारा प्रसार सर्वप्रथम शोधला – तकामी (१९०१)
परिभाषिक शब्द-बटाट्यातील पोकळपणा – हॅलोहर्ट रोग, शेंडे मर – डायबॅक, डिंक्या रोग – गम्मॉसिस इ.
खते :–
वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी मुलद्रव्ये – २०
शेतीसाठी शेणखत वापरण्याची सुचना करणारा शास्ञज्ञ – झायनोफोन
पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्याची गरज असते असे १८७० मध्ये सांगणारा शास्त्रज्ञ – लायबीग
पीकांना १६ अन्नद्रव्यांची नितांत आवश्यकता असते असे सिध्द करणारा शास्त्रज्ञ – अरनॉन
कृत्रिमरित्या युरिया तयारा करणारा शास्त्रज्ञ – फेड्रिक व्होलर (१८२८)
युरोपमध्ये १९०५ साली नत्र खताचा व १९११ साली जर्मनी येथे स्फुरद खताचा पहिला कारखाना सुरू झाला.
भारतातील पहिला खत प्रकल्प – सिंद्री (झारखंड) (१९५१)
भारतात उत्पादनासाठी ९ राष्ट्रीय महामंडळे आहेत.
खतांसंबधी भारताचा नविन कायदा (नियंत्रण आदेश जारी) – १९८५
देशात खतांसंबंधी नियंत्रण ठेवणा-या ४३ प्रयोगशाळा असून गाझियाबाद हे मध्यवर्ती केंद्र आहे. तर मुंबई, कलकत्ता, चेन्नई येथे निभागीय केंद्र आहेत.
भारतातील ८०% खतांचा वापर भात, गहू व उस या पीकांसाठी करतात.
नत्र खताच्या निर्मितीत भारताचा जगात क्रमांक – तिसरा (२००४)
राज्यातील रासायनिक खत नियंत्रण प्रयोगशाळा – १) पुणे २) नाशिक ३) औरंगाबाद ४) अमरावती
आशिया खंडातील सर्वत मोठा अमोनिया प्लॅट – थळवायशेत (रायगड)

खत वापर:-

महाराष्ट्र (१९३०) १ लाख टन (२०००-२००३) १८.१ लाख टन

भारत (१९५०) ७० हजार टन (१९९९-२०००) १८०.७ लाख टन (२००३-०४) १७५ ला. टन

जगाचा दर हेक्टरी खत वापर – १०० किलो.
जगात जपानचा दर हेक्टरी खत वापर – २५० किलो’
भारताचा दर हेक्टरी खत वापर – ८७.५६ किलो
पंजाबचा दर हेक्टरी खत वापर – १६३.३५ किलो
भारतात खताचा दर हेक्टरी सर्वाधिक वापर – आंध्रप्रदेश (१७९.२० किलो)
भारतात सर्वात कमी खत वापर – सिक्कीम (७.६ किलो)
महाराष्ट्राचा दर हेक्टरी खत वापर – ७५.७३ किलो
राज्याचा खत वापराचा उतरता क्रम – नत्र, स्फुरद, पालाश.

खते देण्याच्या पध्दती :-

१) फेकून देणे २) पट्टा पध्दत ३) इंजेक्शन पध्दत ४) गोळी करून (भातासाठी) ५) बियांना चोळून ६) फवा-याद्वारे खत देण्यास फोलिअरऍप्लिकेशन अशी संज्ञ आहे.
ओलीताच्या पाण्याबरोबर खते देण्यास संज्ञा – फर्टिगेशन
खतांचा वापर योग्य होतो की नाही हे पाहण्यासाठी वापरतात – रेडिओ फॉस्फ रस
जमिनीची सुपीकता ठरविण्याची आधुनिक पध्दत – कार्बन, नायट्रोजन गुणोत्तर
भारतीय जमिनीचे कार्बन – नायट्रोजन जन (C : N) गुणोत्तर सरासरी पेक्षा कमी आहे. – १४
पीकांच्या योग्य वाढीसाठी नत्र स्फुरद व पालाशचा संतुलीत वापर – ४:२:१
पीकांच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक – नायट्रोजन (नत्र)
वनस्पतीच्या पोषणासाठी आवश्यक अन्नद्रव्ये – १) नायट्रोजन ५० ते ६०% २) पोटॅशियम १० ते २०% ३) सल्फर १० ते २०%
जमिनीत हेक्टरी ५६ किलो स्फुरद आवश्यक असते. कमी असल्यास हेक्टरी २२.५ किलो ची मात्रा देतात.
केळी, बटाटा, टोकॅटो, फुलकोची यांना पालाशची जास्त गरज असते.

खताचे प्रकार

सेंद्रिय खते रासायनिक खते जैविक खते

नञयुक्त (N) स्फुरद (P) पालाश (K) संयुक्त

१) सिंद्रिय खते – ही खते वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांपासून मिळतात.

अ) भरखते – यात पोषकद्रव्ये कमी असतात. ही खते सावकाश लाहगू पडतात. या खतांमुळे जमिनीचा पोत व

जलधारण क्षमता वाढते. उदा – शेणखत, कंपोस्ट खत इ.

ब) जोरखते – यात पोषणद्रव्ये जास्त असतात. उदा – सर्व पेंडी, हाडांचा चुरा, मासळीखत इ.

निसर्गशेतीचा (सेंद्रीय शेतीचा) जनक – मसानाबू फुफुओका (जपान) यांनी वन स्ट्रॉनिव्होल्यूशन हे पुस्तक लिहिले, निसर्गशेतीची तत्वे – १) जमिनीची मशागत न करणे २) रासानिक असेंद्रिय खते न वापरणे ३) तणनाशक न वापरणे
आम्लयुक्त जमिनीत भातासाठी उपयुक्त हिरवळीचे खत – धैंचा, ग्लिरीसिडीचा इ.स
आम्लारीयुक्त जमिनीसाठी उपयुक्त हिरवळीचे खत – सुबाभळीची पाने
शेतीत तयार होणारे सेंद्रीय पदार्थ शास्त्रीय पध्दतीने जीवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार होणारे खत – कंपोस्ट खत
कंपोस्ट खत तयार करण्याची बंगळूर पध्दत विकसित केली – डॉ. सी. एन. आचार्य
जनावरांपासून मिळणा-या मलमुत्रापैकी कोंबडीच्या विष्टेत सर्वाधिक नत्र, स्फुरद व चुना असतो.
सर्वाधिक नत्र स्थिर करणारे हिरवळीचे खत हेक्टरी – हरभरा (१२० कि), ताग (९० कि) सोयाबीन (९० कि)

सेंद्रिय खतातील प्रमुख अन्नद्रव्यांचे प्रमाण
खताचे नाव अन्नद्रव्यांचे प्रमाण (टक्के)
नत्र स्फुरद पालाश
१) शेणखत

२) लेंडीखत

३) कंपोस्ट खत

४) सोनखत

५) भूईमुग पेंड

६) सरकी पेंड

७) एरंडी पेंड

८) लिंबोळी पेंड

९) हाडचुरा

१०) मासळी खत
०.८० ०.६५ १.००

०.६० ०.५० ०.७०

०.५० ०.६५ ०.८८

१.३० १.१० ०.३५

७.१० १.४० १.३०

६.४० २.८० २.५०

४.५० १.७० ०.७०

५.०० १.०० १.५०

३.५० २१.५० -

४.१० ०.९० ०.३०

२) रासायनिक खते –

मुख्य अन्नद्रव्ये – १) नत्रखते-

अमाईडच्या स्वरूपात नत्र पुरविणारे खत – युरिया
नायट्रेटच्या स्वरूपात नत्र शोषणा-या वनस्पती – टोमॅटो, सेलेरी इ.
आमोनियाच्या आयन स्वरूपात नत्र शोषणा-या वनस्पती – भात
अमोनिया शुभ्र पांढ-या स्फ्टीकरूपाचा असून पिकांना त्वरीत लागू पडतो व तिच्याव्दारे नाश नाही.
कोणत्याही स्वरूपातील नत्र शोषणा-या वनस्पती – बटाटा,शुगरबीट, अननस इ.
पीकांच्या उत्तम वाढीसाठी नायट्रेट व आमोनियाचे प्रमाण – ८०:२०
पीकांच्या उत्तम वाढीसाठी हेक्टरी आवश्यक बोरॉन व मॉलिब्लेंडम – ३० ग्रॅम व ३ ग्रॅम
फ्लॉवरवर ब्राउनिंग हा रोग बोरॉनच्या कमतरतेमुळे येतो.
हरीतद्रव्यातील महत्वाचा अन्न घटक – मॅग्नेशियम
वनस्पतीतील पेशी व पानांची वाढ होण्यासाठी आवश्यक घटक – मॅग्नेशियम व कॅल्शियम
वनस्पतीत स्टार्च मिर्मितीसाठी आवश्यक घटक – पोटॅशिअम
वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक घटक – गंधक व लोह
नत्र– हरीतद्रव्य निर्मिती, पालवीला हिरवा रंग येतो
स्फुरद – वनस्पतीचे श्वसन, वाढ उत्पत्तीत महत्वाचे कार्य ,जोमदार वाढ .
पालाश – मुळात रोग कीड,थंडीपासून प्रतिकार क्षमता वाढते.
गंधक – पानात हरितद्रव्य तयार करणे,तेलबियात तेलाचे प्रमान वाढवणे,

द्विदल मुळात गाठी तयार करणे.

कॅल्शिअम – पेशींची वाढ ,पेशी विभाजन, पेशींना बळकटी इ.
मॅग्नेशिअम – हरितद्रव्याचा महत्वाचा घटक (१५ ते २०%) प्रकाश संश्लेषणात सहभागी.
जस्त – हरितद्रव्य निर्मितीस सहाय्य, स्टार्च निर्मितीशी संबंधीत.
तांबे – अ जीवनसत्व तयार करणे.
बोरॉन – नवीन पेशींची वाढ, परागसिंचन, परागणात वाढ करणे.
मॅगनिज – नत्र संचयन आणि वितंचकांना चालना देणे. सिंथेसिस, संश्लेषण
सिलीकॉन – झाडे टनक बनतात, लोळत नाही, रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
तांब्याच्या अभावी समर डायबॅक.
बोरॉन – याच्या अभावी होणारे रोग-शुगरबीट, रताळी (कँकर), लिंबावर डिंक्यू इ.

प्रमुख अन्नद्रव्ये पुरविणारी खते
खताचे नाव अन्नद्रव्यांचे प्रमाण (टक्के)
नञ स्फुरद ऑक्साईट पालाश ऑक्साईट
नत्रयुक्त खते

१) अमोनियम सल्फेट

२) कॅल्शियम अमोनियम नायट्रेट

३) अमोनियम सल्फेट नायट्रेट

४) युरिया स्फुरद युक्त खते

१) सिंगल सुपर फॉस्फेट

२) ट्रिपल सुपर फॉस्फेट

३) डायकॅल्शियम फॉस्फेट

पालाशयुक्त खते

१) म्युरेट ऑफ पोटॅश

२) सल्फेट ऑफ पोटॅश

संयुक्त खते

१) नायट्रो फोस्फेट

२) नायट्रो फोस्फेट (पोटॅशसह)

३) मोनो अमोनियम फॉस्फेट

४) डाय अमोनियम फॉस्फेट

कृषी विकास

सुफला

महाधन

भगिरथ

युरमफॉस
२०.६

२५.०

२६०.

४६.०

-

-

-

-

-

२०.०

१५.०

११.०

१८.०

१५

१५

२३

१८

२८
-

-

-

१६.०

४२.५

२६.०

-

-

२०.०

१५.०

५५.०

४६.०

०५

१५

२३

१८

२८
-

-

-

-

-

-

५८.०

४८.०

-

१५.०

-

-

०५

१५

००

१०

००

सुक्ष्म अन्नद्रव्ये पुरविणारी खते
खताचे नाव अन्नद्रव्य शेकडा प्रमाण
१) फेरस स्लफेट

२) अमोनियम फेरस सल्फेट

३) मॅगनिज सल्फेट

४) बोरॅक्स

५) बोरीक ऍसिड

६) अमोनियम मॉलिब्लेंट

७) कॉपर सल्फेट

८) झिंक सल्फेट
लोह

लोह

मंगल

बोरॉन

बोरॉन

मॉलिब्डेनम

तांबे

जस्त
२०.००

१४.००

२४.३०

११.००

१७.००

५४.००

२५.००

२२.००

अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय
अन्नद्रव्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे व उपाय
१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)
नत्र

स्फूरद

पालाश

लोह

बोरॉन

जस्त

मंगल

मॉलिब्डेनम

तांबे

गंधक
झाडाची पाने पिवळी होतात, मुळाची व झाडांची वाढ थांबते १% युरियाची फवारणी करावी.

पाने हिरवट लांबट होउन वाढ खुंटते, पानाची मागील बाजू जांभळट होते. १% डायअमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी.

पानांच्या कडा तांबटसर होउन पानावर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होउन शेंडे गळून पडतात. ५% सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी.

शेंडयाकडील पानांच्या शिरामधील भाग हिराकसची अथवा फेरस पिवळा होतो व झाडांची वाढ खुंटते. अर्धा ते १% अमोनियम सल्फेटची फवारणी करावी.

झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होवून मरतात. पानावर सुरकत्या पडून पिवळे चट्टे पडतात. अर्धाग्रॅम बोरॅक्स १०० लि. पाण्यातून फवारणे.

पाने लहान होउन शिरामधील भाग पिवळा होतो व पाने ठिकठिकाणी वाळलेले दिसतात. हेक्टरी २ ते १० कि. झिंक सल्फेट जमिनीतून देणे किंवा १ कि. झिंक सल्फेट १०० लि. पाण्यातून पिकावर फवारावे.

पानांच्या शिरा हिरव्या/ शिरामधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो. व नंतर पांढरट व करडा संपुर्ण पान फिकट पिवळसर दिसते. पानांची वाढ कमी होवून नंतर पान गळते. हेक्टरी ८/२५ कि. मॅगनीज सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा १% मॅगनीज सल्फेट फवारावे.

पाने पिवळी होउन त्यावर तपकिरी ठिपके पडतात, पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्त्रवतो. हेक्टरी पाव ते अर्धा किलो मॉली ब्लेंडम फवारावे.

झाडांच्या शेंड्याची वाढ खुंटते. झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो व खोडाची वाढ कमी होते, पाने लगेच गळतात. मोरचूद ४ ग्रॅम १ लि. पाण्यात मिसळून फवारावे.

झाडांच्या कोवळ्या पानांचा मुळ्चा हिरवा रंग कमी कमी होतो. व नंतर पाने पुर्ण पिवळी पडतात. हेक्टरी २० ते ४० कि. गंधक जमिनीतून दयावे.

३) जीवाणू खते –

ऍझॅटोबॅक्टर या जीवाणूचा १९०१ मध्ये सर्वप्रथम शोध लावणारा शास्त्रज्ञ – बायरीक – डॉ. जोहान्ना डोबेरीनर
ऍझॅटोबॅक्टर पेक्षा ऍझोस्पिरिलम जास्त नत्र स्थिरीकरण करतात असा शोध लावला – डॉ. जोदन्ना, डॉ. बेरीनर
नत्र स्थिर करणा-या जीवाणू खतास संज्ञा-जीवाणू संवर्धन / बॅक्टेरियल कल्चर किंवा बॅक्टेरियल इनाक्यूलंट.निळ्या हिरव्या शैवालातील हेट्रोसिस्ट या पेशी नत्र स्थिर करतात . हरितद्रव्यामुळे हे हिरवे दिसते तर फायकोसायनिन मुळे निळे दिसते.
नत्र स्थिर करणा-या जीवाणूस संज्ञा – नायट्रॉजन फिक्सर
पेरणीपुर्वी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम जीवाणू खते चोळल्यास नत्राची हेक्टरी ३०% बचत होते व उत्पादनात १० ते २०% वाढ होते.
जैविक खताच्या विकासासाठी राष्ट्रीय केंद्र – गाझियाबाद (उ. प्रदेश) येथे असून नागपुर. बंगलोर, जबलपुर, हिस्सार, भूवनेश्वर व इंफाळ येथे विभागीय केंद्रे आहेत.
महाराष्ट्रात लोणेर (रायगड), इगतपुरी (नाशिक), पालशेत (रत्नागिरी), मालवण (सिंधुदुर्ग) , डमरी (नागपुर), मालडोंगरी (भंडारा), बाभोडी (चंद्रपुर), पालोरा (गडचिरोली) व राधानगरी (कोल्हापुर) इ. नउ ठिकाणी निलहरीत शैवाल निर्मितीचे केंद्रे आहेत.

जीवाणू खताचे प्रकार –

१) –हायझोबियम (सहजीवी Symbiotic) – याचे जीवाणू द्विदल (शेंगवर्गीय) वर्गीय वनस्पतीच्या मुळावर गाठी करून राहतात. हे जीवाणू अन्न वनस्पतीकडून घेतात. व हवेतील मुक्त नायट्रोजनचे स्थिरीकरण करून अमोनियाच्या रूपाने वनस्पतींना मुळावाटे पुरवितात. मुळावरील एका गाठीत लाखो जीवाणू असतात. पुर्ण वाढलेल्या गाठी लोह हिमोग्लोबीन मुळे गुलाबी दिसतात.

२) ऍझोस्पिरिलय (सह सहयोगी Associative) – हे जीवाणू तृणधान्याच्या व भाजीपाला पीकांच्या मुळामध्ये व मुळाभोवती राहून नत्र स्थिर करण्याचे कार्य करतात. हे ऍझॉटोबॅक्टर पेक्षा दिडपट ते दोनपट नञ पिकांना पुरवितात.

३) ऍझॅटोबॅक्टर (असहजीवी Non-symbiotic) – शेंगावर्गीय पीके वगळता इतर एकदल व तृणधान्यात पीकांच्या मुळाभोवती राहून असहजीवी पध्दतीने नत्र वायूचे अमोनियात रूपांतर करतात. उदा- ज्वारी, बाजरी, उस, गहू, मका, कापुस, सुर्यफुल, इ. भाजीपाला – टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, नवलकोल, कांदा, बटाटा, फळझाडे व फुलझाडे.

४) बायजेरिंकीया – (असहजीवी) – हे जीवाणू मुख्यतः आम्लधर्मी जमिनीत आढळ्तात व शेंगावर्गीय पीके वगळून एकदल व तृणधान्य पीकांसाठी वापरतात. उदा- भात.

५) निळे हिरवे शैवाल – निळे हिरवे शैवाल हे एकपेशीय किंवा फांद्यासह किंवा फांदयाविरहीत तंतू असतात. या शेवाळात ऍलोसिरा, टॉलीपोथ्रिक्स, नॉस्टॉक व ऍनाबेना यांचा समावेश होतो. निळया हिरव्या शैवालातील हेट्रोसिस्ट या पेशी नत्र स्थिर करतात. हरितद्रव्यामुळे हे हिरवे दिसते. तर फायकोयायनिन मुळे निळे दिसते. यांची वाढ भात शेतात चांगली होते. हे हेक्टरी ३० किलो वापरल्यास नत्राची २५% बचत होते.

६) अझोला – अझोला पाणवनस्पतीच्या पेशीत नेचे वर्गीय ऍनाबेना अझोली ही निळे हिरवे शैवाल सहयोगी पध्दतीने वाढते. वनस्पती अन्न तयार करते व शैवाल हवेतील नत्र स्थिर करते व अझोला त साठविते. अझोलामुळे प्रतिवर्षी प्रति हेक्टरी २० ते ४० किलो नत्र मिळू शकते. भारतात अझोलाची, अझोला पिनाटा जात सर्वत्र आढळते.

७) स्फुरद विरघळणारे जीवाणू (फॉस्फे टसोल्यूबिलायझर) –

स्फुरदमुळे कर्बयुक्त पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया जोमाने होते. पिकांच्या मुळांची जोमदार वाढ होते. जमिनीत विरघळण्यास स्फुरद खते सर्वात कठीण आहे.
पीक फॉस्फरीक ऍसिडच्या रूपाने स्फुरद घेतात.
काही जीवाणू सायट्रीक आम्ल, लॅक्टीक आम्ल, सिक्सिलीक आम्ल, फ्यूमारिक आम्ल, फॉस्फेटचे द्रवात रूपांतर करून पीकास उपलब्ध करून देतात.
रशियात अशा कृत्रिमरित्या संवर्धन केलेल्या जीवाणू फॉस्फोबॅक्टरीन असे नाव दिले.
भारतात ICAR (दिल्ली येथे) ने १९८३ पासून स्फुरद विरघळविणा-या जीवाणूंचे संशोधन सुरू केले व अशा जीवाणू खतास मायक्रोफॉस कल्चर असे नाव दिले.
स्फुरद विरघळविणारे जीवाणू – बॅसिलस, सुडोमानास, अक्रोमोबॅक्टर इ.
स्फुरद विरघळविणारे जीवाणू खते वापरल्यास उत्पन्नात होणारी वाढ – सोयाबीन व

भूईमुग – २०% , हरभरा – २३ ते ३३%, बटाटा – ६० ते ७०%

स्फुरद विरघळविणारी बुरशी – व्हिए मायकोरायझा

१) ऍस्परजीलस् २) पेनीसिलीअम ३) रायझोपस ४) स्ट्रेप्टोमायसिन

एकात्मिक तण व्यवस्थान –

तणांचा बंदोबस्त करण्यासाठी खुरपणी, कोळपणी व तणनाशकांचा वापर करतात.
द्विदल तणांसाठी तणनाशक – फेनॉक्जी (२-४-डी)
तणामुळे अन्नधान्य उत्पादनात होणारी घट – ३० ते ४०%
तण उगवण्यापुर्वीच त्याची वाढ होवू नये म्हणून प्रमाणित बी वापरणे,पीक पेरणीपुर्वीच तणांचा नायनाट करणे, पुर्ण कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत वापरणे याला म्हणतात – प्रतिबंधक उपाय
तण उगवल्यावर नायनाट करण्यासाठी यंत्राचा वापर करणे, योग्य पीक पध्दती अवलंबणे, तणनाशकाचा वापर करणे याला म्हणतात – निवारात्मक उपाय.
तणांचा बंदोबस्त करण्यासाठी एकच पध्दत न वापरता अनेक पध्दतीची सांगड घालणे – एकात्मिक तण व्यवस्थापन

कृषी संशोधन

इंडियन ऍग्रीकल्चरल इन्स्टिटयूटची स्थापना केव्हा झाली – १९०५ मध्ये पुसा येथे
१९६५ मध्ये ही संस्था दिल्लीला हलविण्यात आली व तिचे नाव भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR) असे ठेवण्यात आले.
देशात कृषी संसोधन व शिक्षण विभागाची स्थापना – १९७३
कृषी मशीन प्रशिक्षण व परिक्षण संस्था – बुदनी (म. प्रदेश), हिस्सार (हरियाणा), गारलाडिने (आंध्रप्रदेश), विश्वनाथ चरियाली (आसाम)
राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान योजना (NATP) सुरू – १९९८
केंद्रीय कृषी विद्यालय – इंफाळ
राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था – हैद्राबाद
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची स्थापना – पुणे (१९६३)
राज्यात कृषी संशोधन व कृषी शिक्षणाचे काम कृषी विद्यापीठांकडे सोपविले – १९६६
कृषी विस्ताराचे काम करण्यासाठी राज्याचा कृषी विभाग व जिल्हा परिषदांचा विकास केला – १९६६
कृषी विद्यापीठातील संशोधन प्रभावीपणे शेतक-यांपर्यत पोहचविण्यासाठी योजना – प्रशिक्षण व भेट योजना

भारतीय कृषी संशोधन संस्था – दिल्ली

भारतीय कृषी संशोधन संस्थेने सुरू केलेली वेगवेगळी संशोधन केंद्र व इतर संस्था

१) पीक प्रणाली संशोधन केंद्र मोदीपुर (मेरठ, उत्तरप्रदेश)

२) गहू संशोधन केंद्र कर्नाल हरियाणा

३) राष्ट्रीय मासेमारी अनुवांशिक संशोधन ब्युरो लखनौ

४) राष्ट्रीय पशु अनुवांशिक संशोधन ब्युरो कर्नाल

५) जैविक नियंत्रण प्रयोजना बंगलोर

६) जल प्रबंध अनुसंधान संस्था पटना

७) केंद्रीय कांदा व लसून संशोधन केद्र राजगुरू नगर(पुणे)

८) आवळा संशोधन केंद्र फैजाबाद (युपी)

९) नारळ संशोधन केद्र कासरगोड (केरळ)

१०) केंद्रीय केळी संशोधन केद्र कळांडूथोराई

११) डाळींब संशोधन केद्र सांगोला (सोलापुर)

१२) द्राक्ष संशोधन केंद्र पुणे

१३) दुध संशोधन संस्था कर्नाल

१४) बटाटा संशोधन केंद्र सिमला

१५) संत्री संशोधन केंद्र नागपुर

१६) मसाला पीके संशोधन केंद्र केरळ

१७) मेंढी व लोकर संशोधन केंद्र अंबिकानगर (गुजरात)

१८) उद्यानविद्या संशोधन केंद्र बंगलोर

१९) गवत व चारा संशोधन केंद्र झाशी

२०) लाख संशोधन केंद्र रांची (झारखंड)

२१) अखिल भारतीय उस तंत्रवैज्ञानिक संस्था कानपुर

२२) इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर

सेमी अऍरीड ट्रॉपिक्स (ICRISAT) हैद्राबाद

२३) फायबर रिसर्च स्टेशन कोईमतुर

२४) केंद्रीय मधुमाशी संशोधन केंद्र पुणे

२५) केंद्रीय अन्नधान्य तांत्रिक संशोधन संस्था नागपुर

२६) केंद्रीय उंट संशोधन केंद्र जोरबिट (बिकानेर जवळ)

२७) केंद्रीय फळ संशोधन केंद्र गणेशखिंड (पुणे)

२८) केंद्रीय अन्नधान्य महामंडळ मद्रास

२९) केंद्रीय मृदाक्षारता संशोधन केंद्र कर्नाल (हरियाणा)

३०) केंद्रीय मृदा तसेच पदार्थ संशोधन केंद्र दिल्ली

३१) केंद्रीय ताग संशोधन केंद्र बराकपुर (प. बंगाल)

३२) भारतीय मृदा विज्ञान संस्था भोपाळ

३३) भारतीय ज्वारी संशोधन केंद्र राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)

३४) भारतीय कापुस संशोधन केंद्र नागपुर

३५) तंबाखू संशोधन केंद्र राजमहेंद्री (आंध्र)

३६) सोयाबीन संशोधन केंद्र इंदोर (मध्यप्रदेश)

३७) अखिल भारतीय मका प्रकल्प विंटर नर्सरी अंबरपेठ (हैद्राबाद)

३८) समशीतोष्णीय फलोद्यान संचालनालय लखनौ

३९) मध्यवर्ती कंद पीके संशोधन संस्था (लागवड) थिरूअनंतपुरम्

४०) भारतीय फलोद्यान संस्थ हिस्सारगट्टा

४१) राष्ट्रीय काजू संशोधन केंद्र पुहूर

४२) राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळे संशोधन केंद्र नागपुर

४३) राष्ट्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन केंद्र लखनौ

४४) राष्ट्रीय आळंबी (मशरूम) संशोधन केंद्र सोलन

४५) मध्येवर्ती अवर्षण विभाग संशोधन संस्था जोधपुर

४६) राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमीउपयोगिता मंडळ नागपूर

४७) राष्ट्रीय वनस्पती गुणसुञे मंडळ दिल्ली

४८) केंद्रीय उस संशोधन केंद्र लखनौ

राज्यस्तरीय संशोधन केंद्र

संशोधन केंद्र ठिकाण

१) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ पुणे

२) महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ मुंबई

३) वॉटर अँन्ड लँड मॅनेजमेंट इन्स्टिटयूट (वॉल्मी) औरंगाबाद

४) कोरडवाहू जमिन संशोधन केंद्र सोलापुर

५) लिंबुवर्गीय फळे संशोधन केंद्र काटोल (नागपुर)

६) कांदा संशोधन केंद्र निफाड

७) गहू संशोधन केंद्र निफाड

८) गेरवा (तांबेरा) संशोधन केंद्र महाबळेश्वर

९) उस संशोधन केंद्र पाडेगाव (सातारा)

१०) प्रादेशिक उस व गुळ संशोधन केंद्र कोल्हापुर

११) सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन (रायगड)

१२) नारळ संशोधन केंद्र भाटये (रत्नागिरी)

१३) काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

१४) आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

१५) केळी संशोधन केंद्र यावला (सिंधुदुर्ग)

१६) तेलबिया व गळीत धान्य संशोधन केंद्र जळगाव

१७) सिताफळ संशोधन केंद्र आंबेजोगाई (बीड)

१८) मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर (अहमदनगर)

१९) पानवेल संशोधन केंद्र वडनेरभैरव (नाशिक)

डिग्रज (सांगली)

२०) भाजीपाला संशोधन केंद्र वाकवली

२१) तेडताड प्रकल्प कणकावली

२२) वनौषधी संशोधन केंद्र वडगणे – कोल्हापुर

२३) गळीत धान्य संशोधन केंद्र लातूर


1 टिप्पणी: